कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा ‘मनसे’ विशेष शो दाखवला जाणार; मनसे ‘ते’ ट्विट चर्चेत
प्रचार सुरु होताच प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर शाब्दिक तोफगोळ्यांचा मारा सुरु केला आहे. नाराज असणाऱ्या शिवसेनेच्या दुखण्यावर बोट ठेऊन चंद्रकांत पाटील बंटी पाटलांवर टीका करत आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाला तर राजकारण सोडून देईन: अरविंद केजरीवाल
थेट पाइपलाईनने आजपर्यंत कोल्हापूरच्या जनतेला पाणी पाहायला मिळालेले नाही. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम फूटभरही झालेले नाही आणि पूरग्रस्तांना तर तुम्ही दमडीचीही मदत अजूनही दिलेली नाही. तुम्ही टोलची पावती फाडली तर आम्ही टोल माफी करण्यावर भर दिला. राज्यात ५० वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता असताना कोल्हापूरकरांसाठी काँग्रेसने काय केले याचा हिशोब बिंदू चौकात द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये सत्तेत असताना काय केलं, याचा हिशोब देऊ असं थेट आव्हान चंद्रकांत पाटलांनी बंटी पाटलांना दिले आहे. सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. माजी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, महादेवराव महाडिक आणि भाजपच्या नगरसेवकांनी यावेळी हजेरी लावली होती. सगळी सत्ता आपल्या हाती एकवटी पहिजे असे काही जणांना वाटते. त्यातूनच गोकूळ माझ्याकडेच, जिल्हा बँकेवर माझीच सत्ता, पालकमंत्री मीच, आमदारकी माझ्याच घरात असं काहींचं सुरु आहे. कोल्हापूरच्या जनतेने यांना आता धडा शिकवावा असं आव्हान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केलं आहे.
Read also:
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा
- “शेंडी जानव्याचे राजकारण नको”; विनायक राऊतांच्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाज आक्रमक
- माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? तर ती आत्महत्या करेल; जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक वक्तव्य
- रूपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात एकच चर्चा
- मग हिजाब, बुरखा घालणाऱ्या राज्यात मुलीला पाठवणार का? जितेंद्र आव्हांना सदाभाऊ खोतांचा सवाल