औरंगाबाद : राज्यात सध्या शिवसेनेच्या खासदारांनी शिवसंपर्क अभियान सुरू केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या अभियाना अंतर्गत नागपुर येथील लोकांशी संवाद साधला तर खासदार विनायक राऊत सध्या औरंगाबाद याठिकाणी आहेत. मात्र त्यांनी त्याठिकाणी शेंडी जानव्याचे राजकारण नको असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर ब्राम्हण समाज नाराज झाला आहे.
शिवसंपर्क अभियाना अंतर्गत खासदार विनायक राऊत यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींना उद्देशून शेंडी जानव्याचे राजकारण नको, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर बाजून टिका केली जात आहे. विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाजने आक्रमक भूमिका घेतली आहे. विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण समाजाने केली आहे.
“बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस”; चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
विनायक राऊत यांनी यावरून जर माफी मागीतली नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आमचा रोष व्यक्त करू. तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरू. आगामी काळात ब्राम्हण समाजावर कोणत्याही पक्षाने वक्तव्य केले तर सहन केले जाणार नाही असं ब्राम्हण समाज समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी सांगितलं आहे.
आयुक्त कैलाश जाधवांच्या बदलीचे नक्की कारण काय? नाशिक पालिकेत रमेश पवार यांची नियुक्ती
दरम्यान, गोवा आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही. त्यावरून भाजपने त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करत डिवचण्याचा प्रयत्न केला. अशातच आता आज शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक पार पडली होती. त्यात 22 मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानुसार शिवसेनेतर्फे 19 खासदार राज्यात शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे.
Read also:
- माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? तर ती आत्महत्या करेल; जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक वक्तव्य
- रूपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात एकच चर्चा
- मग हिजाब, बुरखा घालणाऱ्या राज्यात मुलीला पाठवणार का? जितेंद्र आव्हांना सदाभाऊ खोतांचा सवाल
- ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा ‘मनसे’ विशेष शो दाखवला जाणार; मनसे ‘ते’ ट्विट चर्चेत
- महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाला तर राजकारण सोडून देईन: अरविंद केजरीवाल