पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आपल्या ४० आमदारांसह थेट गुवाहाटी गाठलं. एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांसह १० अपक्ष आमदार देखील शिंदेसोबत गुवाहाटील गेलेत. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू देखील सहभागी झाले होते. यातच आता गुवाहाटीला का गेलो होतो? याबाबत बच्चू कडू यांनी भाष्य केलंय.
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”
गुवाहाटीला जाण्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. शिंदे सोबत गुवाहाटीला जाण्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा मी त्यांच्या त्यांच्यापुढे एक अट घातली होती. ती अट अशी होती की मी तुमच्यासोबत येतो, परंतु, दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात झालं पाहिजे. त्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला अन् मग मी गुवाहाटीला गेलो.
हेही वाचा…“२४१० नाही तर ४००० प्रतिक्विंटल कांद्याला भाव द्या,” शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
दरम्यान, पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रमात त्यांनी गुवाहाटीला जाण्याचं कारण सांगितलंय. यातच शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारावरून कॅबिनेट मंत्रीपदाची बच्चू कडू पहिल्यापासून मागणी करीत होते. कोणत्याही परिस्थिती मंत्रिपद मिळणारच, असं बच्चू कडू मोठ्या हिमंतीने सांगत होते. परंतु अजित पवार सत्तेत सामील झाल्याने बच्चू कडू यांच्यासह शिंदे गटातील आमदारांची गोची झाली.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”
हेही वाचा…कांदा सगळ्यांनाच रडवणार, केंद्र सरकारचा फसवा डाव
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर