केंद्र सरकारने कांदा २४१० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे २ लाख कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा. पंरतु यामागे शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकराने मोठा डाव टाकलाय. यामुळे आगामी काही काळात कांदा शेतकऱ्यांनाच नाही तर सगळ्यानांच रडवणार असल्याचं सुतोवाच मिळताहेत. ऐनवेळी कांदा काढणीला आल्यावर पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काढणीला आलेला कांदा पावसाने भिजून गेला. तर शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीत पाणी घुसल्याने कांदा खराब झाला.
हेही वाचा…“मासे खाल्ल्याने एश्वर्या रॉयचे डोळे सुंदर, शिंदेंच्या मंत्र्यांना महिला आयोगाची नोटीस, कारवाई होणार”
यामुळे मागील वर्षापेक्षा अगदी कमी कांदा शेतकऱ्यांकडे साठवणुक आहेत. नाशिक जिल्हातील कांदा लागवडीच्या क्षेत्रात फिरत असतांना अनेक ठिकाणी मागील वर्षापेक्षा कांद्याच्या चाळी कमी भरलेल्या दिसल्या. तर काही ठिकाणी रिकाम्याच दिसताहेत. यामुळे शेतकऱ्यांकडे कांद्याची साठवणुक अगदी कमी प्रमाणात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. या सगळ्यांचं निरिक्षण केलं असता कांदा व्यापाऱ्यांनी कांदा निर्याती शुल्कावरून अचानक केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. ते यासाठी की केंद्र सरकार कांद्याला नाफक दर लावून शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेल्या सर्व कांदा विकत घेईल. त्यानंतर आपोआप बाजारपेठात कांद्याचा पुरवठा कमी होईल. अन् हीच संधी साधून व्यापारी आपल्याकडील असलेला माल बाजारात हळूहळू विक्रिस काढतील. मग व्यापाऱ्याला पाहिजे तसा भाव ठरवून कांदा विक्री करता येईल. यामध्ये फक्त व्यापाऱ्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांचा नाही.
हेही वाचा…“ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या, त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार?”, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
विचार करा…..,
मागच्या वेळी टॉमेटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं. त्यामुळे टॉमटोचं बाजारभाव आपोआप कमी झालं. पाच रूपये, दहा रूपये किलोने शेतकऱ्यांच्या टॉमेटोला दर मिळाला. यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नैराश्य आलं अन् उभ्या पिकात शेतकऱ्यांनी टॉमोट्याच्या शेतात नागर फिरवला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी टॉमेटो रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे बाजारपेठेत टॉमोटोचा पुरवठा कमी होत गेला. त्यानंतर अचानक बाजारातून टॉमोटो गायब झाल्याने टॉमोटोचा भाव गगनाला भिडला. इतिहासात प्रति करेट टॉमेटोला ३१५० पेक्षा अधिक भाव मिळाला. २०० ते २५० रूपये प्रति किलो टॉमटो विकला गेला. टॉमटोचं भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारला नेपाळहून टॉमटो खरेदी करावा लागला. त्यामुळे कांद्याचंही असचं होणार, यात काही शंका नाही. केंद्र सरकार कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडील सर्व कांदा खरेदी करणार अन् नंतर हळूहळू कांद्याचा पुरवठा बाजारात कमी झालं की अव्वाच्या सव्वा भावाने कांदा विक्री करणार. यामागील गणित आपण समजून घेतलं पाहिजे.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”
हेही वाचा…“२४१० नाही तर ४००० प्रतिक्विंटल कांद्याला भाव द्या,” शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी