नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढविण्याच्या विरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात रूई येथील गावातील शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.
हेही वाचा…“ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या, त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार?”, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
केंद्र सरकारच्या निर्यात शुल्काच्या विरोधात गेल्या दोन ते तीन दिवसापासून आंदोलने सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात जवळपास १६ बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. तर रूई गावात शेतकरी कमाल तापल्याचे दिसून येत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये बहिष्कार टाकण्याचा ठरावही समंत करण्यात आला आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीन कांदे रस्त्यावर फेकून रूई गावात आंदोलन करण्यात आलं.
हेही वाचा…फडणवीस साहेब…! “राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका,” रोहित पवारांनी सरकारचं पितळ उघडं पाडलं
दरम्यान, यातच केंद्र सरकारने प्रति क्विंटल २४१० रूपये कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून २ लाख क्विंटल कांदा खरेदी केला जाईल. अशी घोषणा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलीय. तर कांद्याला ४००० रूपये हमीभाव द्यावा आणि २० लाख क्विंटल कांदा खरेदी करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”
हेही वाचा…“२४१० नाही तर ४००० प्रतिक्विंटल कांद्याला भाव द्या,” शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
हेही वाचा…“मासे खाल्ल्याने एश्वर्या रॉयचे डोळे सुंदर, शिंदेंच्या मंत्र्यांना महिला आयोगाची नोटीस, कारवाई होणार”