पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्र सरकार नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रूपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करणार असल्याची घोषणा मंत्री पियुष गोयल यांनी केलीय. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे.
हेही वाचा…“१५ वर्षापासून आमदार, ८ वर्ष मंत्री पद कोल्हापुरसाठी काय केलं ?” , महाडिकांनी सतेज पाटलांकडून हिशोब मागितला
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल. असं ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. त्यावर आता रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय.
हेही वाचा…मोठी बातमी…! गिरणी कामगारांसाठी एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, मुळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या तुम्हाला अद्यापही समजलेलीच दिसत नाही. जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय मात्र पायाला. त्यामुळे थोडा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या. तुमच्या राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका. एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक आहे. केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार म्हणजे केवळ २० दिवसाची आवक खरेदी करणार आहे. त्यानंतर काय? खरेदीसाठी ही मर्यादा का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…राजकारण तापलं..,! पवारांवर केलेल्या टिकेवरून वळसे-पाटलांना अजित पवार गटाचा पाठिंबा, तर शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन
पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जातो. तेंव्हा कांद्याचे निर्यातक्षम गुणवत्तेचे निकष असतात. या निकषाने नाफेड खरेदी करणार असेल तर बाजाराच्या सरासरी २४१० रु दरानेच खरेदी का? बाजाराच्या उच्चांकी २८०० रु प्रती क्विंटल दराने खरेदी का केली जात नाही? नाफेडकडे पडून असलेला कांदाही केंद्र सरकार विक्रीस काढणार आहे. त्यामुळं भविष्यात अजून भाव कोसळतील, याचा विचार शासनाने केला आहे का? चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्यापैकी ३० ते ४० % कांदा खराब झाला. चांगला भाव मिळाला असता तर हे नुकसान भरुन काढता आलं असतं. याचा शासनाने विचार का केला नाही? जेंव्हा कांद्याचे भाव कोसळतात तेंव्हा सरकार हस्तक्षेप करत नाही आणि आज भाव वाढण्याची केवळ शक्यता निर्माण झाली असताना सरकार हस्तक्षेप करतं, हे कुठलं धोरण? हा कुठला न्याय? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय.
मा. फडणवीस साहेब मुळात #कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या तुम्हाला अद्यापही समजलेलीच दिसत नाही. जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय मात्र पायाला. त्यामुळे थोडा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या. तुमच्या राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका. एकट्या नाशिक जिल्ह्यात… pic.twitter.com/3aLy07rWlj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“लोकं तुमच्या तोंडात आता शेण घालणार”, अंबादास दानवे कांदा प्रश्नावरून दादा भुसे यांच्यावर भडकले
हेही वाचा…केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मोठी घोषणा, 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करणार
हेही वाचा…“तोपर्यंत केंद्रातल्या मंत्र्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घाला, ” अमोल कोल्हें केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…“कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, अन् शेतकऱ्यांनी सरकारला,” केंद्र सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…शरद पवारांची मोठी राजकीय खेळी, ३६ जिल्हांसाठी नेमले जिल्हा प्रभारी