मुंबई : अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते असं मंत्री दिलीप वळसे पाटल यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दिलीप वळसे पाटलांवर कडाडून टिका केलीय. तर अजित पवार गटाने दिलीप वळसे पाटलांच्या विधानाला समर्थन दिलंय. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील खासदाराच्या नावे बनावट लेटरहेड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला बेड्या
नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. शरद पवारांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे. असं अजित पवार गटाच्या ट्विटवर हॅंडलवर म्हटलं आहे.
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
दरम्यान, शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून दिलीप वळसे पाटलांवर शरद पवार गटाने जोरदार टिका केली. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिलीप वळसे पाटलांच्या फोटोंना जोडमारो आंदोलनही केलं. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी केलेल्या विधानाबद्दल दिलगिरीही व्यक्त केलीय. तसेच शरद पवार यांच्यावर टिका किंवा काही चुकीचे बोललो नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले, पण तुम्ही..,” धारकरांच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे-अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“एखाद्याला गुर्मी येते, तशी गुर्मी भाजपला येत गेली”, मित्र पक्षांच्या नेत्याचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“चंद्रकांत खैरेंचं वय वाढलं, पण राजकीय अक्कल काही वाढली नाही”
हेही वाचा…ठाकरेंना मोठा दिलासा..! मोठ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…“असली विधाने ऐकताना लोक बधिर होतात”, अंबादास दानवेंची भाजपच्या मंत्र्यांवर टिका