मुंबई : भाजपकडून महाराष्ट्रात दंगलीचं राजकारण केलं जात आहे. यापुर्वी राज्यात सात दंगली घडल्या, हे भाजपाचं कटकारस्थान होतं. मुस्लीम आणि दलीत बांधव उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने येऊ नये म्हणून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केलाय.
हेही वाचा…संजय राऊत लोकसभा निवडणुक लढवणार, म्हणाले, “दोन ते सव्वा लाख मतांनी सहज…,”
चंद्रकांत खैरे यांचं वय वाढलं आहे. पण त्यांची राजकीय अक्कल काही वाढली नाही. ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. देशात दलित आणि आदिवासींना मानसन्मान देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते आहेत. त्यांना खासदारकी हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या चरणी निष्ठा दाखविल्याशिवाय त्यांचं भलं होणार नाही. त्यामुळे ते बोलत आहेत. असं त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ताकद दिलीत आता तेच..,” वळसे पाटलांवर रोहित पवारांची जोरदार टिका
दरम्यान, राज्यात सध्या ईडीचं सरकार असल्याची टिका विरोधक करत आहेत. त्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही विकासाचे राजकारण करतात आणि विकासासाठी इतर जे नेते आहेत. ते आमच्या पक्षात येत आहे. शरद पवार वैफल्यग्रस्त, भेदरले आहेत. असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंना मोठा दिलासा..! मोठ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…“असली विधाने ऐकताना लोक बधिर होतात”, अंबादास दानवेंची भाजपच्या मंत्र्यांवर टिका
हेही वाचा…शिंदे गटातील खासदाराच्या नावे बनावट लेटरहेड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला बेड्या
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…भुजबळांच्या कानाखाली लावेल, त्याला १ लाखांचं बक्षिस, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ, कोणी केली घोषणा ?