मुंबई : अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते असं मंत्री दिलीप वळसे पाटल यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दिलीप वळसे पाटलांवर कडाडून टिका केलीय.
हेही वाचा…“सत्ता गेली तर ते आमदार कुठेही दिसणार नाही, जनता शरद पवार अन् ठाकरेंच्या सोबत”, मित्र पक्षांनीच भाजपला डिवचलं
मला आश्चर्य वाटतंय. लोक कदाचित असं म्हणतील की शरद पवारांच्या आसपास जे लोक आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने जबाबदारी पार पाडायला हवी होती, ती त्यांनी पार पाडली नसावी, म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसला पुर्णपणे बहुमत मिळालं नाही. शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ज्यांना ताकद दिली, तेच जर आज या काळात, या वयात त्यांच्याबरोबर नसतील, जो विचार त्यांनी ३५ ते ४० वर्ष स्वत : जपला, त्या विचाराला सोडून जर ते पलीकडे गेले असतील, तर आज त्याबाबतीत त्यांना बोलायचा किती हक्क आहे? हे बघावं लागेल. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील”
दरम्यान, देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“ऐश्वर्या रॉय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर, तुम्हीही खा..”, भाजप मंत्र्यांचं अजब विधान
हेही वाचा…लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील ! भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“तुम्ही सत्तेसाठी निष्ठा फार विकून खाल्ली”, वळसे पाटलांवर आव्हाडांची खरमरीत टिका
हेही वाचा…“ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? आपण आपले देव ओळखायला शिका”
हेही वाचा…धनंजय मुंडेंचा दिलदारपणा..! ‘त्या’ चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली