मुंबई : राज्यात एक वर्षात दोन मोठे पक्ष फोडल्याचा आरोप भाजपवर सातत्याने केला जात आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेना पक्ष फोडला. त्यानंतर आता शरद पवारांपासून राष्ट्रवादी पक्ष फोडला. मात्र जनता उद्धव ठाकरे अन् शरद पवारांसोबत असल्याचं आता भाजपचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…बीडची उत्तर सभा होणारच, अजित पवार भाषण करणार, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
एकनाथ शिंदे आणि अजितदादाबरोबर गेलेले सगळे लोक हे सत्ता गेल्यानंतर अजून कुठे जातील हे कळणारही नाही. मात्र सामान्य जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसते. मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. काॅंग्रेस पक्षाचे नेते शहाणपणाने वागले तर त्यांना चांगले दिवस येतील. असंही राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मनसेने टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,” दिपाली सय्यदचा खोचक टोला
दरम्यान, मागील काही दिवसापासून महादेव जानकर भाजपवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी त्या स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील”
हेही वाचा…“बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच, तळपायाला लावा”, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक टोला
हेही वाचा…“ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, भिडेंनी मुद्दाम संभाजी नाव ठेवलंय”
हेही वाचा…अभिनेत्री दिपाली सय्यद निवडणुक लढवणार, शिंदे तिकीट देणार
हेही वाचा…“सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल, मुख्य खुर्ची बदलणार “