मुंबई : देवेंद्र फडणवस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उप, झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महापेरू बनले. मुख्य चा उप झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य तांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. उप ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी मुख्य असणाऱ्याने आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाण महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस सांभाळा. असं म्हणत सामानातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामानातून टिका करण्यात आली आहे. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“अजित पवार-शरद पवारांची ‘ती’ भेट राजकीय नाही तर..,” मोठं कारण आलं समोर
किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊतांनी आज सामानातून फडणवीसांच्या विरोधात गरळ ओकळी. २०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वत:च्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्वावादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलं. उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा. अशी जहरी टिका बावनकुळेंनी ठाकरेंवर केलीय.
हेही वाचा…“त्यामुळेच शरद पवारांच्या सभेनंतर २७ ऑगस्टची अजित पवारांची उत्तरसभा सभा रद्द”, कारण आलं समोर
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टिकेवर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरं बोललात आपण चंद्रशेखर बावनकुळे. तोफ ही आग ओकत असते, आणि सामना ही तोफ आहे. या तोफेचा मारा तुम्हाला सहन होत नाही. हे तुमच्या तडफडीतून स्पष्ट दिसते. बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच. तळपायाला लावा. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, भिडेंनी मुद्दाम संभाजी नाव ठेवलंय”
हेही वाचा…अभिनेत्री दिपाली सय्यद निवडणुक लढवणार, शिंदे तिकीट देणार
हेही वाचा…“सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल, मुख्य खुर्ची बदलणार “
हेही वाचा…बीडची उत्तर सभा होणारच, अजित पवार भाषण करणार, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“मनसेने टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,” दिपाली सय्यदचा खोचक टोला