मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या खड्ड्यांवरून राज ठाकरे यांनी पनवेल मध्ये जाहीर सभा घेत मनसैनिकांनी आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या. आंदोलन असं करा की दहशत निर्माण झाली पाहिजे,असं सांगितल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाके फोडले. त्यानंतर आता संपुर्ण राज्यात मनसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसैनिकांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल
मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे, दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा. असा टोला देखील दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लगावला.
हेही वाचा…महाराष्ट्रातील आमदार सर्वात मालमाल…! सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २ क्रमांकावर, अनेकजण कोट्यावधीचे मालक
दरम्यान, अनेक दिवसापासून गोवा- मुंबई महामार्गावरील खड्यांचा विषय गाजत आहेत. अनेक वर्ष होऊनही शासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यावरून आता मनसेकडून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.
मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम,उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पन! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा!
— Deepali Sayed (@deepalisayed) August 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार-शरद पवारांची ‘ती’ भेट राजकीय नाही तर..,” मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…“त्यामुळेच शरद पवारांच्या सभेनंतर २७ ऑगस्टची अजित पवारांची उत्तरसभा सभा रद्द”, कारण आलं समोर
हेही वाचा…“नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नाही, ” मलिकांच्या ‘त्या’ केसबद्दल भाजप नेत्याचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, त्यांना हटवा अन्यथा..,” शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेंकडे कैफियत
हेही वाचा…“वैफल्यगस्त, महापेरू, फडणवीस सांभाळा, अहंकाराचा पिळ, बोरूबहाद्दर,” भाजप अन् ठाकरे गटात शाब्दिक चकमक