पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते, लोकसभेपूर्वी होणाऱ्या पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी देखील पक्षाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीवर या पाच राज्यांतील निकालांचा परिणाम होणार असल्याने काहीही करून विजय मिळवायचाच हा निर्धार केंद्रीय नेतृत्वाने केला आहे. यासाठी महाराष्ट्रातील ८० विद्यमान आमदारांना लोकांचा कल जाणून घेण्यासाठी या राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांची भाजपवर जहरी टिका
डिसेंबर महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपचे योजनाबद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने आता कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप आमदारांना या राज्यांमध्ये धाडण्यात आल आहे.
हेही वाचा…शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी कधी घेणार, ? राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
महाराष्ट्रातील ८० आमदारांना पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये पाठविण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला. सात दिवसांचा दौऱ्यात आमदारांचे पहिल्या दिवशी प्रशिक्षण घेण्यात येईल. पुढील सहा दिवसांत जबाबदारी देण्यात आलेल्या मतदारसंघात फिरून मतदार, भाजप पदाधिकारी, उद्योजक यांच्याशी संपर्क करणे, मतदारसंघाचा कल जाणून घेणे, विरोधी गटातील हालचालींचा अंदाज घेण्याचे काम या आमदारांच्या माध्यमातून केले जाणार आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय वॉररुमच्या माध्यमातून या दौऱ्यावर लक्ष ठेवले जाणार असून दररोज केलेल्या कामांचा आढावा आपल्या मोबाइल ॲपच्या माध्यमातून अपलोड करायचा आहे. पक्षाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदारांची माहिती भाजपच्या राष्ट्रीय आणि प्रदेश नेतृत्वाकडे पोहचवली जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्रातील आमदार सर्वात मालमाल…! सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २ क्रमांकावर, अनेकजण कोट्यावधीचे मालक
हेही वाचा…“बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, साथ द्या,” उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
हेही वाचा…अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘१०’ मोठ्या नेत्यांवर
हेही वाचा…मोठी बातमी…! महाराष्ट्राचे ५० तडपदार आमदार मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ५० उमेदवार ठरवणार
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे”