नाशिक : तलाठी भरतीच्या परिक्षा काल पासून संपुर्ण महाराष्ट्र सुरू झाल्यात. यातच नाशिक येथील एका परिक्षा केंद्रावर हायटेक कॉपी करतांना एका उमेदवाराला पोलिसांनी पकडलं आहे. त्याच्याकडून मोबाईल, हेडफोन आणि इतर साहित्य देखील जप्त केलेत. यावरून आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा…नितीन गडकरींचा काटा काढण्याचा नरेंद्र मोदी अन् अमित शहा यांचा मोठा डाव
नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरूणांच्या भवितव्याशी भाजपप्रणित राज्य सरकार खेळ खेळत आहे. नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परिक्षा होत नाही. गुरूवारी तलाठी पदाच्या परिक्षेचा पेपर फुटला आणि लाखो तरूणांची निराशा झाली. सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे. राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पाहत नाही तलाठी परिक्षेच्या पेपर फुटीमागे जे लोक असतील त्या सर्वांचा छडा लावून कठोर शिक्षा करा जेणेकरून भविष्यात कोणीही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार नाही. अस नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“तुम्ही घाबरताय, तुम्हाला लोकशाही नकोय”, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
सरकारला नोकर भरती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता येत नाही, दोषींना शिक्षा करण्याची मानसिकताही या सरकारमध्ये नाही. उलट पेपर फुटीच्या बातम्या देणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला जातो, हे अत्यंत आक्षेपार्ह व निर्ढावलेल्या मनोवृत्तीचा प्रकार आहे. गृहमंत्री फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे. तसेच, नोकर भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरु असलेला खेळ तिघाडी सरकारने थांबवावा अन्यथा विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले तर सरकारला ते महागात पडेल. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी कधी घेणार, ? राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंना घातला गराडा, मुंडेंवर प्रश्नांची केली सरबत्ती
हेही वाचा…महाराष्ट्राचे सर्व भाजप आमदार परराज्यात जाणार, लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी
हेही वाचा…खासदार कोल्हे कुणासोबत? : म्हणतात… विचारांसाठी शरद पवार अन् विकासकामांसाठी अजित पवार!