पुणे : आमच्यातील लोकनेते अजित पवार भाजपबरोबर गेले आहेत. भाजपबरोबर गेलेल्या लोकनेत्याला संपवलं जातं. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या लोकनेत्यांना भाजपाने संपवण्याचं काम केलं. त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही. कुटुंबातील एक व्यक्ती भाजपबरोबर गेल्याने भीती आणि वाईटही वाटतं. शेवटी संघर्ष करण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“तुम्ही घाबरताय, तुम्हाला लोकशाही नकोय”, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
संजय राऊत आणि काॅंग्रेसच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य दुरूस्त करतील. थोडीफार शंका असेल, तरच ते बोलत असतात. हीच महाविकास आघाडीची खासियत आहे. महाविकास आघाडीत उघड चर्चा होत असते. भाजपासारखं जवळ घेऊन एखाद्या पक्षाला संपवत नाही. मागील बाजूने पक्ष संपवणे ही भाजपाची प्रवृत्ती आहे. महाविकास आघाडीची नाही. असंही रोहित पवारांनी म्हटले आहे.
हेही वाचा…पुन्हा दावे-प्रतिदावे, पुन्हा तेच तेच..! शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात, ८ सप्टेंबरपासून खटला सुरू
दरम्यान, अलिकडेच इंडियाची एका बाजूला बैठक होत असतांना शरद पवारांची अजित पवारांनी भेट घेतली. यानंतर राज्यात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. तर यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी कधी घेणार, ? राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंना घातला गराडा, मुंडेंवर प्रश्नांची केली सरबत्ती
हेही वाचा…महाराष्ट्राचे सर्व भाजप आमदार परराज्यात जाणार, लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी
हेही वाचा…खासदार कोल्हे कुणासोबत? : म्हणतात… विचारांसाठी शरद पवार अन् विकासकामांसाठी अजित पवार!
हेही वाचा…नितीन गडकरींचा काटा काढण्याचा नरेंद्र मोदी अन् अमित शहा यांचा मोठा डाव