मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक विद्यापीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली. रात्री उशिरा यासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुक स्थगित करण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यावरून आता विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
कोणताही आणीबाणीचा काळ नसतांना अचानक असं काय झालं की, सिनेट निवडणुकीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुध्दा निवडणुक स्थगित का करावी वाटली? छाननी होऊनही तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही घाबरताय, तुम्हाला लोकशाही नकोय. निवडणुकांमधून यश मिळणार नाही हे त्यांना समजलंय म्हणून त्यांना केवळ नेमणुका करायच्या आहेत. अशी टिका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केलीय.
हेही वाचा…“याआधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आलंय”
दरम्यान, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणुका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे. असंही वरूण सरदेसाई यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुन्हा दावे-प्रतिदावे, पुन्हा तेच तेच..! शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात, ८ सप्टेंबरपासून खटला सुरू
हेही वाचा…भाजपनं पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल, पण शरद पवारही भाजपचा गेम करतील ?
हेही वाचा…शरद पवारांच्या सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हेही वाचा…मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थगित, विद्यार्थी सेना आक्रमक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात शरद पवारांची मोठी पेरणी , मुंडेंसह भाजपला मोठं आव्हान, चार बड्या नेत्याचा पक्षप्रवेश