ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील एक अशा चार जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वृत्तास ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव यांनी दुजोरा दिला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार ? नवाब मलिकांनी मांडली आपली भूमिका
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही उमेदवार देण्याच्या तयारी मनसे आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांची महायुतीत राज ठाकरे सहभागी होणार नसल्याचं यावरून संकेत मिळत आहेत. तर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात राज ठाकरे सर्वच ठिकाणी उमेदवार देणार असल्याने याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ६३ बस रद्द,” अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घेतलं धारेवर
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केलीय. आज शिरूर, बारामती आणि पुणे या लोकसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे याठिकाणी आता मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“याआधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आलंय”
हेही वाचा…बीडची सभा राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी गाजवली, शरद पवार मैदानात, पुढच्या सभांचा कार्यक्रम ठरला
हेही वाचा…शरद पवारांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, ते म्हणाले मी पुन्हा आले, पण…,
हेही वाचा…“सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पायाशी राहणार”,अन् बीडच्या आमदारांनी शरद पवारांना दिला शब्द