मुंबई : राज्यात मागील पाच वर्षापासून सरकार लवकरच पडणार, कोसळणार अशे वाक्य सातत्याने कानावर पडतांना दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकार असतांनाही विरोधी पक्षात असलेले भाजपचे नेते याचा वारंवार वापर करतांना दिसले. त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतरही आता महाविकास आघाडीतील नेते सत्ता बदल होणार असल्याच्या सातत्याने बाता मारत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यावर भाष्य केलं.
हेही वाचा…“रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, त्यांना हटवा अन्यथा..,” शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेंकडे कैफियत
सत्तेच्या हव्यासाने महाराष्ट्रात वाटेल ते सुरू आहे. येणाऱ्या १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरूवात होईल. सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल. असं भाकित राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तर यावर आता सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“वैफल्यगस्त, महापेरू, फडणवीस सांभाळा, अहंकाराचा पिळ, बोरूबहाद्दर,” भाजप अन् ठाकरे गटात शाब्दिक चकमक
दरम्यान, आज सामानातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली आली. फडणवीसांकडून मुख्य पद गेल्याने अन् त्यांना उप पद आल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. अशी टिका करण्यात आलीय. तर त्यावरून आता भाजपचे नेत्यांनी देखील यावर प्रत्युत्तर दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…बीडची उत्तर सभा होणारच, अजित पवार भाषण करणार, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“मनसेने टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,” दिपाली सय्यदचा खोचक टोला
हेही वाचा…“अजित पवार-शरद पवारांची ‘ती’ भेट राजकीय नाही तर..,” मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…“त्यामुळेच शरद पवारांच्या सभेनंतर २७ ऑगस्टची अजित पवारांची उत्तरसभा सभा रद्द”, कारण आलं समोर
हेही वाचा…“नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नाही, ” मलिकांच्या ‘त्या’ केसबद्दल भाजप नेत्याचं स्पष्टीकरण