मुंबई : पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी इंडिया म्हणून आघाडी स्थापन केली आहे. यातच आता देशातील प्रमुख विरोधी पक्षाची इंडियाची बैठक मुंबईत होत असून या बैठकीत विविध विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता इंडियातील प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावर आता शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…“मनसेने टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,” दिपाली सय्यदचा खोचक टोला
चतुर्वेदी म्हणाल्या की, आम्ही सगळे इंडिया आघाडी फ्रंट फुटवर खेळतोय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेपासून ते लाल किल्ल्यावरील भाषणापर्यंत सगळीकडेच केवळ इंडिया आघाडीवर टिका करत आहेत. त्यावरून समजतयं की पंतप्रधान अस्वस्थ आहेत. आम्ही सद्या २६ पक्ष एकत्र आलो आहोत. या २६ पक्षांचे जितके आमदार-खासदार आहेत. त्या प्रमाणात मतदार आहेत.
हेही वाचा…“अजित पवार-शरद पवारांची ‘ती’ भेट राजकीय नाही तर..,” मोठं कारण आलं समोर
दरम्यान, आम्ही एकत्र येऊन ही लढाई लढत आहोत, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अमित शहा यांच्या मनात भीती निर्माण झालीय. प्रियंका गांधी या वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील. प्रियंका गांधी निवडून याव्यात यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच, तळपायाला लावा”, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक टोला
हेही वाचा…“ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, भिडेंनी मुद्दाम संभाजी नाव ठेवलंय”
हेही वाचा…अभिनेत्री दिपाली सय्यद निवडणुक लढवणार, शिंदे तिकीट देणार
हेही वाचा…“सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल, मुख्य खुर्ची बदलणार “
हेही वाचा…बीडची उत्तर सभा होणारच, अजित पवार भाषण करणार, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण