चंद्रपूर : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यावेळी चंद्रपूरचा खासदार त्यांच्यासाठी हात उंच करेल. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना व अजित पवार सोबतीने 45 हून अधिक लोकसभा जागा निवडून येतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपा कार्यकर्त्याने निश्चय केला असून, काँग्रेसची अमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा…“बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच, तळपायाला लावा”, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक टोला
भाजपाच्या राज्यव्यापी लोकसभा प्रवासाची सुरुवात त्यांनी चंद्रपूर येथून केली. संपर्क से समर्थन अभियानांतर्गत त्यांनी चंद्रपूरच्या तुकुम परिसरात आणि वणी येथील शिवाजी चौक परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील नऊ वर्षांत राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवित संवाद साधला.
हेही वाचा…“ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, भिडेंनी मुद्दाम संभाजी नाव ठेवलंय”
यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी या देशातून भ्रष्टाचार उपटून काढण्याचे काम केले. मागील 9 वर्षात एकही दिवस आराम न करता विकासाचा अजेंडा घेऊन काम करीत आहेत. जनतेच्या मतांचे कर्ज ते इमानदारीने विकासकामे करून व्याजासकट परत करीत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अपघाताने काँग्रेस चा उमेदवार निवडून आला. आगामी निवडणुकीत असा अपघात होऊ देऊ नका. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूरच्या मातीत मिसळून टाका असेही ते यावेळी म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्ही सत्तेसाठी निष्ठा फार विकून खाल्ली”, वळसे पाटलांवर आव्हाडांची खरमरीत टिका
हेही वाचा…“ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? आपण आपले देव ओळखायला शिका”
हेही वाचा…धनंजय मुंडेंचा दिलदारपणा..! ‘त्या’ चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
हेही वाचा…“सत्ता गेली तर ते आमदार कुठेही दिसणार नाही, जनता शरद पवार अन् ठाकरेंच्या सोबत”, मित्र पक्षांनीच भाजपला डिवचलं
हेही वाचा…“प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील”