यवतमाळ : मागील काही महिन्यापासून राज्यात जोरदार पावसामूळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी पाऊसच न पडल्यामुळेही शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झालेत. या दोन्ही परिस्थिती शेतकरी अक्षर:श अडकला. याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी शेतकरी संघटनांनी मुंडेंना गराडा घातला.
हेही वाचा…“सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल, मुख्य खुर्ची बदलणार “
यवतमाळ दौऱ्यावर असतांना धनजंय मुंडे यांना शेतकऱ्यांनी गराडा घालत आत्महत्या केल्याची आकडेवारी सांगितली. त्यावर मुंडेंनी शेतकरी संघटनाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत धनजंय मुंडे यांनी चार आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत: च्या खांद्यावर घेतली. त्यामुळे या गोष्टीची चर्चा सध्या सर्वदूर पसरली आहे.
हेही वाचा…बीडची उत्तर सभा होणारच, अजित पवार भाषण करणार, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. सातत्याने ओढावणाऱ्या संकटामुळे शेतकरी खचत चालला आहे, यामुळे तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे चारही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलासा दिला. मंत्री धनंजय मुंडे हे काल यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी मनोज राठोड यांच्या कुटुंबातील एक महिला त्यांना भेटली.शासनाकडून मिळणारी मदत त्यांना तातडीने मिळेल, याची व्यवस्था त्यांनी केली. पण कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाचा प्रश्नही मुंडे यांनी संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत सोडवला.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्ता गेली तर ते आमदार कुठेही दिसणार नाही, जनता शरद पवार अन् ठाकरेंच्या सोबत”, मित्र पक्षांनीच भाजपला डिवचलं
हेही वाचा…“प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील”
हेही वाचा…“बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच, तळपायाला लावा”, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक टोला
हेही वाचा…“ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, भिडेंनी मुद्दाम संभाजी नाव ठेवलंय”
हेही वाचा…अभिनेत्री दिपाली सय्यद निवडणुक लढवणार, शिंदे तिकीट देणार