नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना सातत्याने विरोधकांकडून महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी याविरोधात जोरदार आंदोलने केलीत. यातच संभाजी भिडे यांच्याकडून सातत्याने महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…अभिनेत्री दिपाली सय्यद निवडणुक लढवणार, शिंदे तिकीट देणार
काहींना सरस्वती तर काहींना शारदा आवडते. पण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरूषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी साहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही. असं भुजबळांनी म्हटलंय.
हेही वाचा…“सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल, मुख्य खुर्ची बदलणार “
ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं.? त्यामुळे आपण आपले देव ओळखायला शिका. तसेच शाळा, महाविद्यालयातं मेरिटमध्ये अनेक मुली असतात. त्यात मुस्लिम मुली देखील असतात. ते पाहिल्यावर समाधान वाटतं. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं. असंही त्यांनी म्हटलं….
READ ALSO :
हेही वाचा…धनंजय मुंडेंचा दिलदारपणा..! ‘त्या’ चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
हेही वाचा…“सत्ता गेली तर ते आमदार कुठेही दिसणार नाही, जनता शरद पवार अन् ठाकरेंच्या सोबत”, मित्र पक्षांनीच भाजपला डिवचलं
हेही वाचा…“प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील”
हेही वाचा…“बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच, तळपायाला लावा”, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक टोला
हेही वाचा…“ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, भिडेंनी मुद्दाम संभाजी नाव ठेवलंय”