धुळे : राज्यात मागील तीन ते चार वर्षापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सरकार मधील मंत्री अडचणीत आले आहेत. महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून विनाकारण वाद ओढवून घेतला आहे. अशातच आता महायुती सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी अशाच पद्धतीचं विधान केल्याने वाद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील”
धुळे जिल्ह्यातील अंर्तूला येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्यात आले होते. यावेळी विजय कुमार यांनी हे विधान केले आहे. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दररोज मासे खाल्ल्यामुळेच अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील, अन् जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल असे वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केले आहे.
हेही वाचा…“बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच, तळपायाला लावा”, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक टोला
दरम्यान, मासे खाल्ल्यावर दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस माणूस म्हणजे बाई आणि माणूस चिकने दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घ्या. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना. ती दररोज मासे खायची बघितले ना तिचे डोळे. तसे तुमचे बी होऊन जाणार. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील ! भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“तुम्ही सत्तेसाठी निष्ठा फार विकून खाल्ली”, वळसे पाटलांवर आव्हाडांची खरमरीत टिका
हेही वाचा…“ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? आपण आपले देव ओळखायला शिका”
हेही वाचा…धनंजय मुंडेंचा दिलदारपणा..! ‘त्या’ चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
हेही वाचा…“सत्ता गेली तर ते आमदार कुठेही दिसणार नाही, जनता शरद पवार अन् ठाकरेंच्या सोबत”, मित्र पक्षांनीच भाजपला डिवचलं