मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने भाजपच्या मित्र पक्षांमध्ये संभ्रमाचा वातावरण निर्माण झालंय. यातच आता एकेकाळी भाजपचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.
हेही वाचा…भुजबळांच्या कानाखाली लावेल, त्याला १ लाखांचं बक्षिस, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ, कोणी केली घोषणा ?
आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती न झाल्यास सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं सुचक विधान त्यांनी केलं आहे. तर मुंडे साहेबांमुळे आम्ही युती केली, आम्ही आमच्या चिन्हावर लढलो होतो, पण नंतर पक्ष वाढत गेल्यानंतर एखाद्याला गुर्मी येते तशी गुर्मी भाजपला येत गेली. तुमची भाजप फार दिवस चालणार नाही, गुंडाळून जाणार आहे. मागच्या सरकारमध्ये काही जणांनी चुका केल्या. त्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी कातडी बचावण्यासाठी, संरक्षणासाठी काही जण सरकारमध्ये गेले. असा घणाघात महादेव जाणकर यांनी चढवला आहे.
हेही वाचा…संजय राऊत लोकसभा निवडणुक लढवणार, म्हणाले, “दोन ते सव्वा लाख मतांनी सहज…,”
दरम्यान, सत्तेचा फायदा घेणारी अजितदादा आणि एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. कॉमन माणूस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. पांढरे, कपडे घालून, चमचमीत गॉगल लावून गाड्यांमधून फिरणारे टगे एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबत गेले आहेत, तीही त्यांची माणसं नाहीत. त्यांची खूर्ची जेव्हा जाईल तेव्हा त्यांच्या मागे कुणी नसणार आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“चंद्रकांत खैरेंचं वय वाढलं, पण राजकीय अक्कल काही वाढली नाही”
हेही वाचा…ठाकरेंना मोठा दिलासा..! मोठ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…“असली विधाने ऐकताना लोक बधिर होतात”, अंबादास दानवेंची भाजपच्या मंत्र्यांवर टिका
हेही वाचा…शिंदे गटातील खासदाराच्या नावे बनावट लेटरहेड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला बेड्या
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”