पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील दोन दिवसापासून नाशिक येथील कांदा बाजारपेठाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली तर जपानमधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
हेही वाचा…राजकारण तापलं..,! पवारांवर केलेल्या टिकेवरून वळसे-पाटलांना अजित पवार गटाचा पाठिंबा, तर शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे अनेक आंदोलने करण्यात आली. यातच आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भेट घेतली. त्यानंतर केंद्र सरकार नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रूपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करणार असल्याची घोषणा मंत्री पियुष गोयल यांनी केलीय आहे.
हेही वाचा…“काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले, पण तुम्ही..,” धारकरांच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे-अजित पवारांवर हल्लाबोल
दरम्यान, राज्यातील मंत्री असो किंवा केंद्रातील मंत्र्यांशी गेल्या दोन दिवसापासून संपर्कात होतो. आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी भेट घेऊन कांदा प्रश्नी चर्चा केलीय. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पियुष गोयल यांच्याशी तब्बल १५ वेळा फोन केला. त्यानंतर आता केंद्र सरकार दुपार पासून २ लाख टन कांदा खरेदी करण्यास सुरूवात करणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. तसेच निर्यात शुल्क वाढीसंदर्भात पुनर्विचार करावा अशीही मागणी केल्याचं मुंडेंनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…“तोपर्यंत केंद्रातल्या मंत्र्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घाला, ” अमोल कोल्हें केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…“कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, अन् शेतकऱ्यांनी सरकारला,” केंद्र सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…शरद पवारांची मोठी राजकीय खेळी, ३६ जिल्हांसाठी नेमले जिल्हा प्रभारी
हेही वाचा…“१५ वर्षापासून आमदार, ८ वर्ष मंत्री पद कोल्हापुरसाठी काय केलं ?” , महाडिकांनी सतेज पाटलांकडून हिशोब मागितला
हेही वाचा…मोठी बातमी…! गिरणी कामगारांसाठी एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा