छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढविल्याने शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून आक्रमक पवित्रा हाती घेत आंदोलन सुरू केलं आहे. त्यावर ज्यांना कांदा खायचा नाही, त्यांनी खाऊ नये, असं विधान काल मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! गिरणी कामगारांसाठी एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
आताचं सरकार असंवेदशील आहेच ना. कांदा खाणं न खाणं, यावर उद्या जेवलं नाही अन् मेलं तर काही फरक पडणार नाही. असंही दादा भुसे सांगतील. मग दादा भुसे मंत्री नसले तर काय फरक पडणार आहे.? असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी केला आहे. मुळ प्रश्न आहे, त्यांना उत्तर दिलं पाहिजे. परंतु उत्तरापासून तोंड लपवण्यासाठी अशी विधाने केली जात आहे. अस दानवेंनी म्हटलंय.
हेही वाचा…राजकारण तापलं..,! पवारांवर केलेल्या टिकेवरून वळसे-पाटलांना अजित पवार गटाचा पाठिंबा, तर शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन
राष्टवादीची युती केली म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असे सांगताहेत. अजिदादा निधी देत नव्हते, त्यांच्या लोकांना निधी देत होते, म्हणून आम्ही बाहेर पडलो. अशी कारणे देत होते. त्यामुळे आता त्यांचं तोंड काळं झालं आहे. लोकांना आता हे काय उत्तर देणार ? लोकं तर आता त्यांच्या तोंडात शेण घालणार, त्यांना जोडे मारणार. त्यामुळे हे तर नक्की होणार. असंही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मोठी घोषणा, 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करणार
हेही वाचा…“तोपर्यंत केंद्रातल्या मंत्र्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घाला, ” अमोल कोल्हें केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…“कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, अन् शेतकऱ्यांनी सरकारला,” केंद्र सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…शरद पवारांची मोठी राजकीय खेळी, ३६ जिल्हांसाठी नेमले जिल्हा प्रभारी
हेही वाचा…“१५ वर्षापासून आमदार, ८ वर्ष मंत्री पद कोल्हापुरसाठी काय केलं ?” , महाडिकांनी सतेज पाटलांकडून हिशोब मागितला