मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यावर केंद्र सरकार २४१० रूपये प्रतिक्विंटल कांदा खरेदी करणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. त्यावर आता नाफेडकरून कांदा खरेदी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र यामधून सरकारने शेतकऱ्यांसोबत मोठा डाव टाकला आहे.
हेही वाचा…“लोकं तुमच्या तोंडात आता शेण घालणार”, अंबादास दानवे कांदा प्रश्नावरून दादा भुसे यांच्यावर भडकले
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केल्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथे कांदा खरेदी सुरू झाली. मात्र यामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत मोठा डाव टाकला आहे. महाराष्ट्रात नाशिक, सोलापुर या जिल्ह्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातंय. मात्र अलिकडेच झालेल्या पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मागील वर्षापेक्षा यावर्षी कमी कांदा साठवणुकीत शिल्लक राहिला आहे.
हेही वाचा…केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मोठी घोषणा, 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करणार
अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नाशिक जिल्हात पावसामुळे काढणीला आलेला कांदा पावसामुळे वाया गेला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर काही ठिकाणी पावसाच्या अगोदर शेतकऱ्यांनी शेतातून कांदा काढला. त्यामुळे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी शेतकऱ्यांकडे कमीच कांदा शिल्लक राहिला. त्यामुळे येत्या काळात कांद्याचं दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉमटोला उत्पादन महाराष्ट्रात जास्त झाल्याने सुरूवातीला शेतकऱ्यांनी सर्व टॉमटो रस्त्यावर फेकून दिला. त्यानंतर टॉमटोच पुरवठा कमी झाल्याने टॉमटोचं भाव गगनाला भिडले. त्याचप्रमाणेच कांद्याचंही दर वाढणार असल्याचं बाजार तज्ञांकडून सांगण्यात येत आहेत.
हेही वाचा…“तोपर्यंत केंद्रातल्या मंत्र्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घाला, ” अमोल कोल्हें केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक
महाराष्ट्रात तीन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने कांद्याच्या पेरण्या तसेच लागवड अद्यापही दरवर्षीप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे खरीप तसेच लेट खरीप कांद्याला याचा मोठा प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता बाजार तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होती. आज सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या तोंडांना पाने पुसण्याचा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”
हेही वाचा…“२४१० नाही तर ४००० प्रतिक्विंटल कांद्याला भाव द्या,” शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
हेही वाचा…“मासे खाल्ल्याने एश्वर्या रॉयचे डोळे सुंदर, शिंदेंच्या मंत्र्यांना महिला आयोगाची नोटीस, कारवाई होणार”
हेही वाचा…“ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या, त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार?”, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
हेही वाचा…फडणवीस साहेब…! “राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका,” रोहित पवारांनी सरकारचं पितळ उघडं पाडलं