मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन झाली. सुरूवातीला प्रत्येकी नऊ असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसह २० आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिपद मिळणार या आशेवर बसलेल्या आमदारांची अजित पवार सत्तेत सामील झाल्याने निराक्षा झाली. अन् मंत्रिमंडळाचा पुर्ण विस्तार होऊ शकला नाही. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या गोंधळात आता आरपीआयलाही मंत्रिपद मिळावं, अशी मागणी आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी केलीय.
हेही वाचा…“२४१० नाही तर ४००० प्रतिक्विंटल कांद्याला भाव द्या,” शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
अजित पवार, एकनाथ शिंदे यासोबतच्या सगळ्यांना मंत्रिपद मिळालं, पण आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. आमची मागणी आहे की, आम्हालाही मंत्रिपद द्यावं. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद द्यावं म्हणून सांगितलं. मात्र अजित पवार यांचा विस्तार होईल समावेश होईल. हे आम्हाला ही माहिती नव्हती. पण तरीही आमची मंत्रिपदाची मागणी कायम आहे. आरपीआयला मंत्रिपद मिळावं. असं आठवलेंनी सांगितलं.
हेही वाचा…“मासे खाल्ल्याने एश्वर्या रॉयचे डोळे सुंदर, शिंदेंच्या मंत्र्यांना महिला आयोगाची नोटीस, कारवाई होणार”
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे मंत्रिपदाची आशा लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांची गोची झाली. तर भाजपमधील काही नेत्यांना मंत्रिपदापासून दुर जावं लागलं. यातच आता सरकारमध्ये तीन पक्षाचं सरकार आल्याने पुढच्या मंत्रिमंडळ विस्तार आणखी कुणाला संधी मिळणार ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कांदा सगळ्यांनाच रडवणार, केंद्र सरकारचा फसवा डाव
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”