मुंबई : मातोश्रीवर सेवा करत असलेल्या चरणसिंग थापा यांनी देखील एकनाथ शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. यातच उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु यावर अजूनही ठोस माहिती समोर आली नाही. यातच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबरराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे.
गुजरातमध्ये मोदीचं भाषण न ऐकताच लोकांनी काढला पळ..! “जुमलेबाजीला जनता वैतागलीय”, काॅंग्रेसने डिवचलं
खोके खोके काय करता? जनता कोरोनाला विसरून गेली. तुमचे खोके कधी विसरून जाईल तुम्हाला कळणार नाही. खोक्याच्या भरवशावर मत मिळत नाही. विकाऊ असतो तर आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले नसते. छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालो आहे. आम्ही जे केलंय. ते सांगून केलंय. ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय. असं म्हणत पाटलांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“सुर्य आणखी तेजस्वी होईल अन् महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण लवकरच सुटेल”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर ठाकरेंना मोठा फटका बसला. अनेक शिवसेनेतील पदाधिकारी, नेते शिंदे गटात सामील झालेत. त्यानंतर आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा नेहमी गद्दार म्हणून उल्लेख केला. त्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात मागील काही दिवसापासून कलगीतुरा बघायला मिळत आहे.
भाजपशी युती नको म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना पाटलांचा सुचक इशारा..! म्हणाले,..;
दरम्यान, पुढे बोलताना गुलाबरराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा कुणावरच विश्वास राहिला नाही. हाबू हाबू करून सर्वांना ते पळवत आहेत. ज्यानं बाळासाहेबांची सावलीसारखी सेवा केली, त्या चरणसिंग थापावर तुमचा विश्वास राहिला नाही. गुलाबराव पाटील मंत्रीपदासाठी शिंदे गटात गेला असं म्हणता. मग चरणसिंग थापाला काय एमएलसी व्हायचं होतं का? असा खोचक सवाल देखील त्यांनी केला.
Read also
- “एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
- “अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”
- “अजित दादांना काहीच काम राहिलं नाही, त्यांनी शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांचं भाषणं ऐकावीत”
- “तुमच्या अंगणामध्ये उगवलेल्या दोन धतुऱ्यांकडे लक्ष द्या”; सेेनेचं राणेंना सणसणीत प्रत्युत्तर
- “उगवत नाही, फुलत नाही अन् वास येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीतच”; राणेंचा ठाकरेंना टोला