मुंबई : येत्या 5 ऑक्टोबरला राज्यात दसरा मेळाव्यानिमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. तर तिकडे शिवाजी पार्क येथील मैदानावर उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार आहे. याआधी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
“सुर्य आणखी तेजस्वी होईल अन् महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण लवकरच सुटेल”
दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बीकेसी मैदानावर जवळपास 3 लाख लोक येणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यासाठी अनेक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असा दावा देखील शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्याआधी अरविंद सावंत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, एक तरफ लाचार एक तरफ सदाचार, एक तरफ बेईमान एक तरफ निष्ठावान, एक तरफ दसरा एक तरफ कचरा, बिके हुये क्या जाने निष्ठा गुमराह कर रहे खाकर विष्ठा ! असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
भाजपशी युती नको म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना पाटलांचा सुचक इशारा..! म्हणाले,..;
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्ही चालू झाल्यानंतर दिसायचे आणि टिव्ही बंद झाला तेही बंद व्हायचे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जनतेचा असावा लागतो. जनतेत काम करणारा असावा लागतो. मी अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. मी कॅबिनेट मंत्री असताना मुख्यमंत्री केवळ पाच साह वेळा मंत्रालयात आले. बाकी सर्व कॅबिनेट ऑनलाईन झाली. असा टोला भुमुरेंनी ठाकरेंना लगावला. औरंगाबाद येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वालांसह इतर आमदार देखील उपस्थित होते.
Read also
- “अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”
- “अजित दादांना काहीच काम राहिलं नाही, त्यांनी शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांचं भाषणं ऐकावीत”
- “तुमच्या अंगणामध्ये उगवलेल्या दोन धतुऱ्यांकडे लक्ष द्या”; सेेनेचं राणेंना सणसणीत प्रत्युत्तर
- “उगवत नाही, फुलत नाही अन् वास येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीतच”; राणेंचा ठाकरेंना टोला
- गुजरातमध्ये मोदीचं भाषण न ऐकताच लोकांनी काढला पळ..! “जुमलेबाजीला जनता वैतागलीय”, काॅंग्रेसने डिवचलं