मुंबई : जर दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू झालं तर त्यांचं भाषण अगोदर मी ऐकणार. एकनाथ शिंदे यांचं भाषण मी नंतर ऐकेन. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात बऱ्याच चर्चा झाल्या. यावर बंडखोर आमदार शाहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने शहाजी बापू पाटलांवर निशाणा साधला आहे.
“आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार”;
अजित दादांनी आता फक्त एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, इंदोरीकर महाराजांची भाषणे ऐकावीत. आता त्यांना काहीच काम उरलं नाही. ते विरोधी पक्षनेते झालेत पण ते कायम सत्तेत राहत असल्यानं नेमक काय करायचे हेच त्यांना कळत नसल्याचे शहाजा बापू पाटलांनी म्हटलं . तसेच दसरा मेळाव्याला पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा विचार ऐकणाऱ्यांनी बीकेसी मैदानावर यावं असंही ते म्हणाले.
छगन भुजबळांवर गुन्हा दाखल..! जीवे ठार मारण्याची दिली धमकी
त्यानंतर शहाजी पाटलांचा राष्ट्रवादीने खुरपुस समाचार घेतला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी पाटलांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, अहो शहाजी बापू पाटील अजितदादावर बोलण्यापेक्षा आता शिंदे गटाची सत्ता आली आहे. मतदारसंघात दोन विकास काम करून घ्या. अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल. असा खोचक टोला हाणला आहे.
“मोदींनीही आत्मनिर्भर व्हावं, किती दिवस दुसऱ्या पक्षातील माणसं पक्ष चालवणार”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला ऐतिहासिक प्रतिसाद मिळणार आहे. सांगोल्यातून अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाला जाणार आहेत. असंही ते म्हणाले. तसेच अजित दादा कायम खुर्चीवर होते. ते आता विरोधी पक्षनेते झालेत. त्यांना कसे काम करावे कळेनासे झाले आहे. त्यांच्या मनातले पवार साहेबांना देखील कळत नाही. त्यामुळं दादा कधी झटका देतील ते सांगता येत नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “तुमच्या अंगणामध्ये उगवलेल्या दोन धतुऱ्यांकडे लक्ष द्या”; सेेनेचं राणेंना सणसणीत प्रत्युत्तर
- “उगवत नाही, फुलत नाही अन् वास येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीतच”; राणेंचा ठाकरेंना टोला
- गुजरातमध्ये मोदीचं भाषण न ऐकताच लोकांनी काढला पळ..! “जुमलेबाजीला जनता वैतागलीय”, काॅंग्रेसने डिवचलं
- “सुर्य आणखी तेजस्वी होईल अन् महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण लवकरच सुटेल”
- भाजपशी युती नको म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना पाटलांचा सुचक इशारा..! म्हणाले,..;