मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सध्या राजकीय संघर्ष टोकाला जात असताना भाजप देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका करताना अलिकडे दिसत आहेत. यातच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टिका केली आहे.
छगन भुजबळांवर गुन्हा दाखल..! जीवे ठार मारण्याची दिली धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे आमदार प्रवीण लाड यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टिका केली. आमचे आशिष शेलार कवी आहेत. बोलता बोलात ते म्हणाले, चाफा बोलेना, चाफा उगवेना, पण असाही चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि वास येत नाही. असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे. बाकी कुठं नाही. असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला.
“मोदींनीही आत्मनिर्भर व्हावं, किती दिवस दुसऱ्या पक्षातील माणसं पक्ष चालवणार”
नारायण राणे यांच्या टिकेला शिवसेनेकडून लगचेच प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांचा उल्लेख धतुरा म्हणून केला. त्या म्हणाल्या की, भाजपचे थोर नेते नारायण राणे यांनी मातोश्रीमध्ये चाफा फुलेल की नाही याची चिंता करू नये. परंतु तुमच्या अंगणामध्ये दोन धतुरे उगवले आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या. असा सणसणीत टोला कांयदे यांनी राणेंना लगावला आहे.
“सत्य, परखड बोलणारे भाजपचे एकमेव नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी”; रूपाली पाटील
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, त्या माणसाला ३९ वर्ष जवळून पाहिलं असून त्याला काहीच येत नाही. अडीच वर्ष त्या माणसाला लोकांनी कसा सहन केला असेल? असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेवरून देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
Read also
- “उगवत नाही, फुलत नाही अन् वास येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीतच”; राणेंचा ठाकरेंना टोला
- गुजरातमध्ये मोदीचं भाषण न ऐकताच लोकांनी काढला पळ..! “जुमलेबाजीला जनता वैतागलीय”, काॅंग्रेसने डिवचलं
- “सुर्य आणखी तेजस्वी होईल अन् महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण लवकरच सुटेल”
- भाजपशी युती नको म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना पाटलांचा सुचक इशारा..! म्हणाले,..;
- “आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार”;