सातारा : एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणी आणि छत्रपतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सध्या अटकेत असलेले गुणरत्ने सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला आहे. सातारा सत्र न्यायालयाने गुणरत्ने सदावर्ते यांना सुरूवातीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची काल पोलीस कोठडीत संपल्यानंतर लगेचच न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयी कोठडी देण्यात आली होती. मात्र आता त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
“राज ठाकरेंचं सोयी अन् सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; मनिषा कांयदे यांचा राज ठाकरेंना टोला
गुणरत्ने सदावर्ते यांना अलिकडेच पोलिसांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावर सदावर्ते यांच्याबाबत न्यायालयात युक्तिवाद झाला. मात्र जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. मंगळवारी याबाबत निर्णय झाला नाही. न्यायालयाने सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात 15 हजार रूपयांचा जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.
“उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी
न्यायालयात 6 वे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून निर्णय दिला.
“आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, गुणरत्ने सदावर्ते यांना शरद पवार बंगल्यावरील हल्लाप्रकरणी अटक करण्यात आली. मात्र त्यांच्या अडचणीत आता दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कारण त्यांच्यावर राज्यातील विविध शहरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड, अकोला पुणे, कोल्हापुर येथील पोलीस गुणरत्ने सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आगामी काही काळात गुणरत्ने सदावर्ते यांना दिलासा कधी मिळणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;
- गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू
- संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल
- “राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा
- “मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर