मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतही हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला. त्यानंतर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी आगामी औरंगाबाद येथील सभा आणि 5 जून रोजी आयोध्याला जाणार असल्याचं जाहीर केलं. आता याचाच धागा पकडत शिवसेना नेत्या मनिषा कांयदे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“ते भोंग्या बिग्यांचं बाजूला ठेवा, आधी महागाईचं बोला; राजू शेट्टींचा राज ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्याला जाण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत व्यंगचित्र काढलं होतं. त्याच व्यंगचित्राचा आधार घेत मनिषा कांयदे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की, अशी वेळ कोणांवरही येऊ नये, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिर ला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदूत्व असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार”
5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह आयोध्या दौरा करणार आहे. त्यादिवशी प्रभू श्रीरामचं ते दर्शन घेणार आहेत. यासाठी मनसेचे काही कार्यकर्ते अयोध्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे मनसेच्या या तीन दिवसाच्या घडामोडींकडे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं लक्ष लागून आहे. तसेच औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी औरंगाबाद सभेबाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, सरकारचे बारा वाजण्यास आणि राज साहेबांच्या संंभाजीनगर येथील ऐतिहासिक सभेस फक्त 12 दिवस शिल्लक बाकी, असं त्यात त्यांनी म्हटलं आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?
दरम्यान, अलिकडेच पुण्यात राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभा आणि 5 जुन रोजी आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्या दृष्टीने सध्या मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा होत असून त्याकडे सभेकडे सगळयांचे लक्ष आहे. त्यासाठी मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Read also:
- “उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी
- “आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस
- “मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो”; शरद पवारांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा टोला
- “जिथं तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही, तिथं सामान्य माणसाची काय कशा ?”
- “तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत सत्ताधारी-विरोधी गप्प”; त्यासाठी हुंकार यात्रा