मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशात विधान परिषदेतील 10 सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला होता. तसेच विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती पत्रावर राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जी विधान परिषदेसाठी पत्राद्वारे जी नावं पाठवली होती. ते पत्र बनावट असल्याचं राज भवनाकडून सांगण्यात आलं आहे.
“दंगलीचं काम भाजपने राज्यात दुसऱ्यांकडे सोपवलंय”; राऊतांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच राज्यपाल नियुक्त सदस्यांची वर्णी लावण्यासाठी स्वत: हुन सहा नावं सुचवल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र राज्यापालांच्या नावाने व्हायरल झालेले पत्र बनावट असल्याचं उघड झालं आहे. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कोणतीही नाव सुचवली नाही. ते पत्र फेक असल्याच राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
राज ठाकरेंच्या सुरक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गृहमंत्र्यांनी केलं मोठं भाष्य
त्या पत्रात वीरभद्रेश करबसप्पा बसवंती, (सामाजिक) रमेश बाबुराव कोकाटे, आडसकर (राजकीय), सतीश रामचंद्र घरत ( उद्योग ) संतोष अशोक नाथ, (सामाजिक ) मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय ) जगन्नाथ शिवाजी पाटील ( सामाजिक ) अशी नाव होती.
सिल्व्हर ओकवरील हल्ला हा तर माझ्या आईवरच झालेला हल्ला- सुप्रिया सुळे
दरम्यान, व्हायरल झालेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, 12 आमदारांच्या नियुक्तीपुर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात राज्यपालांनी सहा सदस्यांच्या नावांची शिफारस केली आहे. राज्यापाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबत हे पत्र आहे. महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी ही नावे घ्यावीत असं त्यात म्हटलं आहे. त्यामुळे यावर आता राज्यातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.
Read also:
- सरकारचे बारा वाजण्यास फक्त 12 दिवस बाकी..; मनसेच्या ‘त्या’ सभेची जोरदार चर्चा
- “आली रे आली.. पोलखोलीला घाबरून, मोहीम उधळून लावण्याची वेळ आली”
- मनसेने जाहीर केल्या 3 ठिकाण, 3 तारखा! मनसेची आगामी राजकीय रणनीती ठरतेय
- मवाळ, ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या, पडळकरांवरील हल्ला, तरी आम्ही शांत अन्..; सदाभाऊ संतापले
- भाजपचं सरकार असताना मशिदीवरील भोंगे का उतरवले नाहीत? हिंदु परिषदेचा भाजपला सवाल