मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून सध्या राजकारण चांगलचं तापलं आहे. तसेच पुढे त्यांच्या तीन सभा होत असून मनसेच्या आगामी सभांकडे आता महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यांसदर्भात पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबई येथील मनसेच्या कार्यकर्त्यांशी बैठक आज झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
राज ठाकरेंच्या सुरक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गृहमंत्र्यांनी केलं मोठं भाष्य
5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह आयोध्या दौरा करणार आहे. त्यादिवशी प्रभू श्रीरामचं ते दर्शन घेणार आहेत. यासाठी मनसेचे काही कार्यकर्ते आयोध्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे मनसेच्या या तीन दिवसाच्या घडामोडींकडे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं लक्ष लागून आहे. तसेच औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी औरंगाबाद सभेबाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, सरकारचे बारा वाजण्यास आणि राज साहेबांच्या संंभाजीनगर येथील ऐतिहासिक सभेस फक्त 12 दिवस शिल्लक बाकी, असं त्यात त्यांनी म्हटलं आहे.
सिल्व्हर ओकवरील हल्ला हा तर माझ्या आईवरच झालेला हल्ला- सुप्रिया सुळे
त्यानंतर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यादिवशी अक्षय तृतीयेचा देखील मुहर्त असून मनसेच्या या दिवसाच्या घडामोडीकडे देखील लोकाचं लक्ष लागून आहे.
तुरूंगात जाणार पण रूबाबात! न्यायालयीन कोठडीत नेतांना सदावर्तेंनी उडवली काॅलर
दरम्यान, अलिकडेच पुण्यात राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभा आणि 5 जुन रोजी आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्या दृष्टीने सध्या मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा होत असून त्याकडे सभेकडे सगळयांचे लक्ष आहे. त्यासाठी मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Read also:
- “आली रे आली.. पोलखोलीला घाबरून, मोहीम उधळून लावण्याची वेळ आली”
- मनसेने जाहीर केल्या 3 ठिकाण, 3 तारखा! मनसेची आगामी राजकीय रणनीती ठरतेय
- मवाळ, ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या, पडळकरांवरील हल्ला, तरी आम्ही शांत अन्..; सदाभाऊ संतापले
- भाजपचं सरकार असताना मशिदीवरील भोंगे का उतरवले नाहीत? हिंदु परिषदेचा भाजपला सवाल
- “दंगलीचं काम भाजपने राज्यात दुसऱ्यांकडे सोपवलंय”; राऊतांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा