मुंबई : रामनवमीच्या दिवशी देशातील विविध राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी हिंसाचार देखील झाला. दिल्लीत देखील दंगलीचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. आगामी काळात दिल्लीत महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्याने त्या दंगली घडवण्याचा काम भाजप करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबई आणि राज्याच्या परिस्थितीवर देखील बोट ठेवत महत्वपूर्ण भाष्य केलं.
आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? खोतांचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
देशाच्या दोन प्रमुख शहरांमध्ये ज्या प्रकारे दंगलीचं वातावरण तयार केलं आहे. हे फार दुर्दैवी आहे, आणि विशेषत हे वातावरण सत्ताधारी भाजपकडून केलं जात असल्याने ते अत्यंत दुर्दैवी आहे. देशाच्या राजधानीत दंगली होत आहेत. हे पहिल्यांदा होत नाही. त्याठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या आहेत. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी कोणता मुद्दा नाही म्हणून केलं जात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला
राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण केला आहे. मुंबईत तुमची ताकद नाही. त्यामुळे तुम्ही कुणालाही पकडून हे काम दिलं आहे, आणि तुुुम्ही भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. असं बोलून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. देशाची अर्थव्यवस्था आता कुठे मुळ पदावर येत असून पुन्हा राजकीय फायद्यासाठी दंगलीचं राजकारण केलं जात आहे. हे असंच सुरू राहिलं तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल, संपून जाईल, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.
“सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा जास्त तडफड”; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांचं राजकारण कमालीचं तापलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठा बदल होऊन राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर राजकारणात मोठा बदल होऊन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also:
- राज ठाकरेंच्या सुरक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गृहमंत्र्यांनी केलं मोठं भाष्य
- सिल्व्हर ओकवरील हल्ला हा तर माझ्या आईवरच झालेला हल्ला- सुप्रिया सुळे
- तुरूंगात जाणार पण रूबाबात! न्यायालयीन कोठडीत नेतांना सदावर्तेंनी उडवली काॅलर
- मुंबई, सातारा, कोल्हापुर, बीड सदावर्तेंचा पुढचा मुक्काम ठरला! 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली
- ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, म्हणत पीएफआयचा इशारा! राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?