पुणे : अलिकडेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला होता. जम्मू काश्मीर कलम, काश्मीर पंडीत, मुंबई हल्ला, अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी ट्विट करत त्याच्या संदर्भातील बातम्या देखील दिल्या होत्या. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका
रोहित पवार म्हणाले की, राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप केला जात आहे. ६ दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सत्तेच्या लालसेपायी पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत. असा टोला देखील त्यांनी लगावला.
राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत! शिवसैनिकांनी दिलेलं चॅलेज पुर्ण करणार का?
परंतु विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत शरद पवारांवर टिका करताना राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीय वाद वाढल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. त्याचाच धागा पकडत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनी घेतलेल्या या मुद्द्यावरून घेरलं होतं.
Read also:
- “बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीय करतं”
- 3 मे पर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा..! नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांबाबत अल्टिमेटम
- “हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा”! चंद्रकांत पाटलांचं ते ट्विट चर्चेत
- “राज ठाकरेंना आता जाग आलीय, परंतु त्यांनी आता जागचं राहवं”; किशोरी पेडणेकरांचा टोला
- महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना