राज्यात सध्या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीने महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे. आज पुण्यात पेट्रोल 119. 97 लिटर असून डिझेल 102.68 लिटर सुरू आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. उन्हाच्या तीव्र झळा सहन करता करता आता महागाईने देखील लोकांचा जीव मेटाकुटीला आणला आहे. काही ठिकाणी पाण्याच्या दोन थेबांसाठी माणसं वणवण भटकत आहेत. मात्र राज्यातील राजकारणी सध्या भोंग्याच्या राजकारणात मश्गुल आहेत. ज्याठिकाणी हिंदु-मुस्लिम सलोखा निर्माण व्हावा. एकोपा वाढवा. त्याठिकाणी फक्त राजकारणासाठी जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचा केवीलपणा प्रयत्न राजकारणी नेत्यांकडून केला जात आहे.
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा चिमटा! म्हणाले, मी त्यांच्यासोबत जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत आणि त्यानंतर ठाण्याच्या सभेत घेतलेली आक्रमक भुमिका काहीशी अशाच प्रकारे आहे. येत्या 3 एप्रिल पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाही, तर त्या समोर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. त्याचे पडसाद देखील राज्यात विविध ठिकाणी बघायला मिळताहेत. यावर दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर त्यांनी स्वत:च्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं, जर उतरवत नसेल तर बहुजन मुलाला देखील उतरवू नका. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना विचारलेला हा प्रश्न काहीअंशी रास्त ठरतोय. तिकडे आग पेटवण्याचे काम भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील केलंय. ज्यांना ज्यांना भोंगे लावायाचे आहेत. त्यांना आमच्याकडून भोंगे मोफत दिले जातील. ही योजना त्यांनी पेट्रोल डिझेल, इंधन, आणि मुलभुत सुविधांसाठी वापरली तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना फायदा होऊ शकतो. परंतु हे त्यांच्या डोक्यात बसताना दिसत नाहीय.
“बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही”
राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेचा धसका देखील राज्य सरकारने घेतलेला दिसतोय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांसदर्भात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी यांची भेट घेणार आहे. तर प्रशासन देखील चांगलाच सतर्क झालाय. पोलिस महासंचालकाने राज्यातील जिल्हा प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवलीय. या बैठकीत भोंगे आणि लाऊडस्पीकर संदर्भात सर्व मार्गदर्शक सुचनाचे कटाक्षाने पालन करण्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर गृहविभागाने राज्यातील सर्व धर्माच्या लोकांना भोंगे, लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकिय परवानगी अनिवार्य करण्यात आलीय.
“डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले”; नाना पटोलेंची भाजपवर टीका
दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेली भोंग्यावरील भूमिकेचा फटका त्यांना चांगलाचं बसलाय. पुण्यात वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवल्यासोबतच राज्यातील अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलीय. केंद्रीय तपास यंत्रणांचा नेत्यांच्या पाठीमागे लागलेला ससेमिरा, किरीट सोमय्या- संजय राऊत वाद, आणि आता भोंग्यांच्या राजकारणांनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. अशातच आता राज्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षाचे सुरू असलेले मेळावे, पक्ष प्रवेश आणि बैठका यातुन महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे. यामधून दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, विधानसभा आणि पुढे लोकसभा निवडणुकांमध्ये या राजकारणी नेत्यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी आता तुम्हाला संधी चालून आलीय. त्यासाठी आपल्याला विचार करण्याची गरज आहे.
Read also:
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका
- राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत! शिवसैनिकांनी दिलेलं चॅलेज पुर्ण करणार का?
- “भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- अनिल देशमुख यांच्याबाबात मोठी अपडेट! न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात महिलेची तक्रार दाखल! जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप