मुंबई : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत तब्बल 18, 901 मतांनी विजय मिळवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकी अगोदर एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता काॅंग्रेसकडून त्यांना डिवचण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का?
ते म्हणाले की, उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीचा विजय आहे. साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून मतदारांनाही धमकावणाऱ्या भाजपला राज्यातील जनतेने या निकालातून सणसणीत चपराक लगावली आहे. मोदी सरकारची बटिक बनलेल्या बुजगावण्या ईडीच्या कारवाईची कोल्हापूरकरांना धमकी देता का? हिंमत असेल तर आता करा कारवाई? डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले, अशी खोचक टीका देखील नाना पटोले यांनी केली.
राणा दाम्पत्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन! मुख्यमंत्र्यांनावरही साधला निशाणा
बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही हे काही लोकांना लक्षात येणारच नाही. वर्षभरात ३५ रुपयांनी डिझेलचे दर महाग करुन केंद्रातील भाजप सरकारने गोरगरीब आणि सामान्य जनतेचे अतोनात हाल केले. देशभरात जातीयवादाचे उन्मादी आणि उन्मत्त राजकारण करणाऱ्या भाजपच्या पाठीत हनुमानाने घातली गदा! हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी देशभरातील लोकसभा आणि विधानसभांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सुपडा साफ, अंसही त्यांनी ट्विट केलं आहे.
17 वी फेरीही काॅंग्रेसच्या पारड्यात ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित
दरम्यान, मोदी सरकारची बटिक बनलेल्या बुजगावण्या ईडीच्या कारवाईची कोल्हापूरकरांना धमकी देता का? हिंमत असेल तर आता करा कारवाई? डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले! राज्यातील सौहार्द आणि सलोख्याचे वातावरण जातीयवादी शक्ती ढवळून काढत असताना महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून महाराष्ट्राला ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे कोटी कोटी आभार. अंसही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “निवडणुकीत भाजपाने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला”; पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- त्यांचे भोंगें कोल्हापुरकरांनीच खाली उतरवले! संजय राऊतांचा मनसे, भाजपला टोला
- “हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी देण्यात येईल”
- कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर रोहित पवारांनी भाजपवर साधला निशाणा! म्हणाले, या पराभवानंतर केंद्रीय यंत्रणा..;
- कोल्हापुरात ‘कमळ’ कोमजलं! पोटनिवडणुकीत काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधवांचा दणदणीत विजय