नाशिक : आज राज्यात हनुमान जयंतीनिमित्त राजकीय पक्षाचे विविध कार्यक्रम होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात येत असून ते हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. तर दुसरीकडे कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारून पराभव झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून भोंग्यावरील राजकारण देखील पेटलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी भाजपवर या दोन्ही मुद्दांवरून सडकून टिका केली आहे.
राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, काही लोक हनुमान चालिसा म्हणायला पुण्याला पोहचले आहेत. मात्र भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. कोल्हापुरात प्रचार शिगेला पोहाचला असतानाच काहींनी भोंगे, हनुमान चालिसा असे घाणेरडे राजकारण सुरू करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे भोंगे उतरवण्याचे काम कोल्हापुरकरांनी केले आहे. हे महाराष्ट्राचे जनमत आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
त्यांचे भोंगें कोल्हापुरकरांनीच खाली उतरवले! संजय राऊतांचा मनसे, भाजपला टोला
पोटनिवडणुकीनंतर आता हिमालयात कोण जातंय ते पाहु. विर्ले-पार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाची सुरूवात केली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही. भोंग्यामागचे आवाज कोणाचे हे साऱ्यांना माहित आहे. भोंग्यांचे राजकारण आता संपले आहे. असंही ते म्हणालेत.
“हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी देण्यात येईल”
दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्यात यावेळी चांगलीच चुरस बघायला मिळाली. या पोटनिवडणुकीत 61.19 टक्के मतदान झालं त्यापैकी एकुण 2 लाख 91 हजार 978 मतदार होतं. यात एक लाख 78 हजार मतदारांनी मतदान केलं. आज झालेल्या मतमोजणीत तब्बल 26 फेऱ्यात जयश्री जाधव याच आघाडीवर होत्या . त्यात त्यांचा विजय झाला.
Read also:
- अनिल देशमुख यांच्याबाबात मोठी अपडेट! न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात महिलेची तक्रार दाखल! जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा चिमटा! म्हणाले, मी त्यांच्यासोबत जाणार
- “बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही”
- “डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले”; नाना पटोलेंची भाजपवर टीका