मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्यावतीने करण्यात आली होती. मात्र विशेष सीबीआय न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
त्यांचे भोंगें कोल्हापुरकरांनीच खाली उतरवले! संजय राऊतांचा मनसे, भाजपला टोला
मागील वर्षी अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुली आणि मनी लॉण्डिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर पोलीस दलाच्या बदल्या आणि नेमणुका याबाबत त्यांच्यावर सध्या सीबीआय आणि इडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करीत आहेत. सध्या देशमुख हे सीबीआयच्या ताब्यात असून तीन दिवसाची त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.
“हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी देण्यात येईल”
अनिल देशमुख यांच्यासह सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पांडे यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांना आता 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे मागील 11 दिवसांपासून सीबीआय कोठडीत आहेत. 6 एप्रिल रोजी त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी 100 कोटी रूपयांची खंडणी मागितल्या असल्याचा आरोप मुंबईचे तात्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला.
Read also:
- भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात महिलेची तक्रार दाखल! जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा चिमटा! म्हणाले, मी त्यांच्यासोबत जाणार
- “बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही”
- “डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले”; नाना पटोलेंची भाजपवर टीका
- “निवडणुकीत भाजपाने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला”; पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया