अमरावती : नवनीत कौर राणा अमरावतीच्या खासदार तसेच एकेकाळच्या साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री… पती रवी राणा बडनेरा विधानसभा मतदारसंघातुन सलग तिसऱ्यांदा अपक्ष आमदार. राज्य तसेच देशातील राजकारणात कायम चर्चेत असणारी ही राजकीय जोडी. आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय… आणि आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठणाचे दिलेलं त्यांनी आव्हान.
“डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले”; नाना पटोलेंची भाजपवर टीका
राज्यभरातील शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री विषयी बोलल्यानंतर वाद होणार हे निश्चित होत, आणि झालंही तसंच, हनुमान जयंतीला नवनीत राणा आणि रवी राणा अमरावतीत पूजा करत होते तर दुसरीकडे मुंबईत मातोश्री बाहेर हजारो शिवसैनिक जमा झालेले… दोन्ही बाजूने जोरदार शाब्दिक चकमक देखील झाली…राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावं असं आव्हान शिवसैनिकांनी यावेळी दिलं. तर शिवसेनेनं तारीख सांगावी आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसेच पठण करूनचं दाखवू असं उत्तर राणा यांनी दिलंय…त्यामुळे यावरून आता हा वाद काही लवकर मिटणार नाही हे नक्की. राणा दाम्पत्याची वादात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही, आजवर अनेकदा शिवसेनेशी त्यांचा सामना झालाय… नवनीत राणा आणि रवी राणा कायम राजकारणात चर्चेत असतात त्याप्रमाणे त्यांची प्रेमकहाणीची देखील चर्चा होत राहते… नवनीत कौर यांचा जन्म 3 जानेवारी 1986 ला मुंबईत झाला… त्यांचे आईवडील हे मूळचे पंजाबमधील राहणारे.
12 पास झाल्यानंतर नवनीत कौर यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. कन्नड चित्रपट दर्शनमधून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तेलगू चित्रपट चेतना, जग्पथी, गुड बॉय 2008 मध्ये रिलीज झालेल्या भूमा सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका देखील साकारली होती. अनेक मल्याळम सिनेमात देखील नवनीत कौर राणा यांनी काम केलेले आहे. मॉडेलिंग आणि अभिनय करत असल्याने त्याचा कल योगाकडे देखील होता. बाबा रामदेव यांना त्या योग साधनेतील गुरू मानतात. रामदेव बाबांच्या आश्रमातच रवी राणा आणि त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. भेटी वाढत गेल्या आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही बाबा रामदेव यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांच्या लग्नाला अनुमती मिळाली. 2 फेब्रुवारी 2011 रोजी कोणताही बडेजाव न करता समूहिक विवाह सोहळ्यात नवनीत कौर आणि रवी राणा यांनी लग्न केले.
त्यांचे भोंगें कोल्हापुरकरांनीच खाली उतरवले! संजय राऊतांचा मनसे, भाजपला टोला
या सोहळयात एकूण 3162 जोडप्यांचे देखील विवाह झाले. या लग्नसोहळाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव, सुब्रतो राय सहारा यांच्यासह राजकारण आणि सिनेसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली. लग्नानंतर नवनीत राणा यांनी फिल्मी करियरमधून बाहेत पडल्या… 2014 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणुक लढवली होती. मात्र शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला होता… मात्र 2017 मध्ये अडसूळ यांना पराभूत करत त्या खासदार बनल्या. तर रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर खासदार झाल्यानंतर नवनीत राणा यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. अशातच आता राज्यातील एक आघाडीच्या महिला नेत्या म्हणून राणा यांचे नाव आज पूढे येत आहे.
Read also:
- “भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- अनिल देशमुख यांच्याबाबात मोठी अपडेट! न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात महिलेची तक्रार दाखल! जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा चिमटा! म्हणाले, मी त्यांच्यासोबत जाणार
- “बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही”