पुणे : वापगावाचा जो किल्ला आहे तो राज्य सरकारने ताब्यात घ्यावा, आणि त्यांचं सवंर्धन जतन करावं अशी मागणी करण्यासाठी यशंवत ब्रिगेडच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. त्या आंदोलनात गोपीचदं पडळकरांनी देखील भेट देऊन त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, एका किल्ल्यासाठी वेगळी आणि दुसऱ्या किल्ल्यासाठी तुम्ही दुसरी भूमिका कशासाठी घेत आहे.? ती पुरातन वास्तू असल्यानं त्याचं सवंर्धन, जतन झालं पाहिजे. थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांनी ती वास्तू बांधली आहे. या वास्तूमध्ये इंग्रजांना सलग 25 वर्ष हरवणाऱ्या यशवंत होळकरांचा जन्म झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना त्या किल्ल्या प्रतिक खुप भावनिक असल्याने तो किल्ला ताब्यात का घेतला जात नाही, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत! शिवसैनिकांनी दिलेलं चॅलेज पुर्ण करणार का?
ते पुढे म्हणाले की, 1965 साली रयत शिक्षण संस्थेेने शिक्षणाच्या चांगल्या कामासाठी दिला आहे. प्रसार माध्यमातुन रयत शिक्षण संस्थेतील घोटाळ्याच्या बातम्या आपण बघत आलो आहे. त्या संस्थेचा आता वटवक्ष झाला असून त्याबाबत भुमिका का घेतली जात नाही. ? जेजरी संस्थांनी उभारलेल्या पुतळ्याच्या उद्घाटानासाठी राजकारण करता. सांगलीतील कुपवडा महानगरपालिकेने बांधलेल्या पुतळ्यासाठी राजकारण करता आणि याकडे आम्ही टाहो फोटून सांगतो की हा किल्ला सरकारच्या ताब्यात द्यावा, त्यावर पाच पन्नास कोटी खर्च करा. त्याबद्दल एक अक्षर पण नाही म्हणजे बोलायचे एक आणि करायचे एक असं झालंय.
“भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारकडून खोटं सांगितलं जात आहे. 2019 च्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने एसटी विलिनीकरणाचा मुद्दा मांडला होता. विश्वास घाताने सरकार आल्यानंतर कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा अधिवेशनात शरद पवारांनी याबाबत सांगितलं होतं. तसेच शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचं आम्ही समर्थन करीत नाहीत. परंतु पवारांचा भूमिका दुटप्पी आहे. माझ्या गाडीवर हल्ला होतो. तेव्हा त्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवतात. कर्मचारी तुमच्या घराकडे चालून आले त्याचा तुम्ही का अभ्यास केला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या केल्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. कारण तुम्ही 50 वर्ष त्या लोकांचं नेतृत्व केलं. विलिनीकरणाची आशा त्यांनी लावली. दुसऱ्यांच्या घरावर दगड टाकल्यावर त्यांचं अभिनंदन करायचं आणि स्वत:;च्या घरावर दगड फेकल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं. असंही त्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांच्याबाबात मोठी अपडेट! न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्य सरकारने नेमलेल्या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, काॅंग्रेसचे आमदार, सुधीर तांबे, भाजपचे आमदार भाई गिरकर, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे ,शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार सुनिल धस यांच्यासोबत मी देखील होतो. त्यात एसटी कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यात सातव्या वेतन आयोगानानुसार पगार देण्याचं ठरलं परंतु अनिल परब यांनी दुसऱ्या दिवशी पलटी घेतली. राज्य सरकार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यासाठी तयार झालं परंतु त्याला आडफाटा पवार कुुटुंबियांनी केला म्हणून त्याचा उदय झाला. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर दोन ते तीन वर्षातील प्रकरण बाहेर काढून गुन्हा दाखल केला जात आहे. बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीयांची निती आहे.हे यातून स्पष्ट होते. दोन वर्ष झोपले होते का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- 3 मे पर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा..! नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांबाबत अल्टिमेटम
- “हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा”! चंद्रकांत पाटलांचं ते ट्विट चर्चेत
- “राज ठाकरेंना आता जाग आलीय, परंतु त्यांनी आता जागचं राहवं”; किशोरी पेडणेकरांचा टोला
- महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका