मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांच्या राजकारणांवरून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन सतर्क झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. अशातच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात महिलेची तक्रार दाखल! जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आमच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारले जात होते. त्याला प्रश्नांना महाआरती हे उत्तर आहे. जागते रहो,एवढंच राज ठाकरेंना सांगेन. त्यांना जाग आली असेल तर चांगलंच आहे. परंतु आता जागच राहावं. जागते रहो. नाहीतर निवडणुका आल्यावर दोन महिने उठायचं अन् नंतर काहीच नाही. असंही ते म्हणालेत.
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा चिमटा! म्हणाले, मी त्यांच्यासोबत जाणार
ज्या भोंग्यांना परवानग्या आहेत आणि जे प्रदुषण टाळत असतील त्यांना न्यायालयाने परवानगी दिली आहे . मात्र विनापरवाना भोंगे असतील तर परवानगी नाही. या बाब सर्वच धर्मांना लागू राहिन. देशाची फाळणी पुन्हा कुणाला हवी का? कोणत्याही गटाची मारामारी असो. सामाजिक सलोखा बिघडत असेल तर पोलिसांनी कडक भुमिका घ्यावी असं आव्हान देखील किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
“बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही”
दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेनंतर मशिदीवरील भोंग्यांबाबतचा मुद्दा राज्यात चांगलाचं पेटला आहे. राज ठाकरे यांनी आक्रमक भुमिका घेतल्याने राज्य सरकारने धसका घेतला आहे. अशातच आता नाशिक पोलीस आयुक्तांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात महत्वाची भूमिका घेतली आहे. भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भात परवानगी घेण्यात यावी असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
Read also:
- महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका
- राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत! शिवसैनिकांनी दिलेलं चॅलेज पुर्ण करणार का?
- “भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- अनिल देशमुख यांच्याबाबात मोठी अपडेट! न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय