मुंबई : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या कोल्हापुर पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत तब्बल 18, 901 मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणि काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण व फटाक्याची आताषाबाजी करीत जल्लोष साजरा केला. या निवडणुकीसाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत अपयश आलं. त्यावर त्यांनी आज एक ट्विट केलं आहे.
अनिल देशमुख यांच्याबाबात मोठी अपडेट! न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी जवळपास एक महिना ठाण मांडून बसले होते. मात्र त्यांना भाजपचा उमेदवार निवडुन आणता आला नाही. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. त्यावर त्यांनी एक ट्विट केलं आहे. हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा, अश्या ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्याचसोबत त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचं देखील नाव लिहिलं आहे.
भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात महिलेची तक्रार दाखल! जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
निवडणुक निकालानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापुरात मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. ही निवडणुक आम्ही फक्त विकासाच्या मुद्यावर लढलो. कुठल्याही निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही आपल्या हाताता असतं आणि ती आम्ही केली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपावर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांचे आभार. या पोटनिवडणुकीत अविरत कष्ट घेणारे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त केल्याबद्दल त्यांचंही मनापासून कौतुक. मतदारांचा कौल मान्य करून आपलं जनसेवेचं निरंतर व्रत यापुढेही कायम ठेवूया, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा चिमटा! म्हणाले, मी त्यांच्यासोबत जाणार
दरम्यान, कोल्हापुरची निवडणुक हरल्यानंतर काॅंग्रेसतर्फे चंद्रकांत पाटलांना जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले होते. की जर निवडणुक हरलो तर हिमालयात निघून जाईन. यानंतर त्यावरून कोल्हापुरात निवडणुक हरलो तर हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीमार्फेत देण्यात येईल असं म्हटलंय.
हार नहीं मानूंगा,
रार नहीं ठानूंगा,– अटल बिहारी वाजपेयी
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 18, 2022
Read also:
- “राज ठाकरेंना आता जाग आलीय, परंतु त्यांनी आता जागचं राहवं”; किशोरी पेडणेकरांचा टोला
- महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका
- राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत! शिवसैनिकांनी दिलेलं चॅलेज पुर्ण करणार का?
- “भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा