पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी विविध पक्षात प्रवेश केला. त्यातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. भाजपमध्ये आपल्यावर अन्याय झाला असल्याचे एकनाथ खडसे हे वारंवार सांगत आहेत. अशातच आता त्यांच्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे.
महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना
ते म्हणाले की, मी पक्षाला मोठे केले मात्र प्रत्यक्षात ते स्वतः साधे ग्रामपंचायतीत देखील निवडुन येत नाहीत. आधी निवडून या आणि मग कुणी मोठं केल्याच्या बाता मारा, त्यांच्याबद्दल आणखी काही बोलणार नाही, एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे बीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत आहे. ढिसाळ कारभार व कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यात नियोजनाचा अभाव हीच राज्यातील वीज टंचाईला कारणीभूत आहेत. खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील कमाई करिताच हा वीजटंचाईचा घाट घातला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका
समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे. त्यानंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. तसेच कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने पुन्हा तोच खेळ मांडला आहे. शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसा टंचाईचे खोटे कारण पुढे केले जात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत! शिवसैनिकांनी दिलेलं चॅलेज पुर्ण करणार का?
केंद्र सरकारने वीज खरेदीच्या दरावर निर्बंध घातल्याने जळफळाट सुरू आहे. दाखविण्याचा प्रकार म्हणजे आपल्या नियोजनशून्य कारभारावर पांघरुण घालण्याचा जुनाच केविलवाणा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले, मार्चपासून जूनअखेरपर्यंत विजेची मागणी वाढते हे स्पष्ट असतानाही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांकरिता कोळसाचा पुरेसा साठा करण्याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोळशाची कृत्रिम टंचाई भासवून खाजगी क्षेत्राकडून चढ्या भावाने कोळसा खरेदी करीत खाजगी क्षेत्राने हितसंबंध जपण्याकरिता गरीब ग्राहकांच्या खिशात हात घालून सरकारनेच समस्याग्रस्त जनतेवर वीजटंचाईचे संकट लादले असल्याचे महाजन म्हणाले आहेत.
Read also:
- “सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा जास्त तडफड”; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
- “बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीय करतं”
- 3 मे पर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा..! नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांबाबत अल्टिमेटम
- “हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा”! चंद्रकांत पाटलांचं ते ट्विट चर्चेत
- “राज ठाकरेंना आता जाग आलीय, परंतु त्यांनी आता जागचं राहवं”; किशोरी पेडणेकरांचा टोला