मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं. त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर रोहित पवारांनी शरद पवार, अजित दादांवर टिका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं म्हटलं होतं. यावर आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टिकास्त्र सोडलं आहे.
“राज ठाकरेंना आता जाग आलीय, परंतु त्यांनी आता जागचं राहवं”; किशोरी पेडणेकरांचा टोला
सदाभाऊ खोत म्हणाले की, रोहित पवार यांनी महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे स्वराज्य हाच जीव की प्राण मानणारी छत्रपती शिवाजी महाराजांची . कुणा पवार कुटुंबीयांनी त्यावर कधी सखोल चिंतन करावं. परंतु आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना
ऊस हे आळशी माणसांचे पीक आहे, असं शरद पवार म्हणातात. त्यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, ह्याच ऊसावर सुपीक राजकारणाचा मळा आपण फुलवला साहेब. रोहित पवार यांनी देखील भाजपवर टिका केली. ते म्हणाले की, १९९३ सालच्या मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्या.श्रीकृष्ण आयोगानेही आदरणीय पवार साहेबांच्या खोटं बोलण्याची विशेष दखल घेत ‘This is the example of statesmanship’ अशा शब्दांत वाखाणणी केली. होय! म्हणूनच शरद पवार साहेबांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे.होय! आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे.
राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका
दरम्यान, साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता. राज्यात दंगल भडकवण्याच्या ISI च्या प्रयत्नांना उधळून लावत आदरणीय पवार साहेबांनी तेंव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.
Read also:
- “एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला
- “सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा जास्त तडफड”; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
- “बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीय करतं”
- 3 मे पर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा..! नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांबाबत अल्टिमेटम
- “हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा”! चंद्रकांत पाटलांचं ते ट्विट चर्चेत