पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या आणि त्यानंतर झालेल्या ठाण्यातील सभेत हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार लावून धरला. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात आक्रमक पवित्रा घेत मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राज ठाकरे यांना जीवे ठार माऱण्यासाठी धमकीचे फोन येत असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
“एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कुठल्यालाही वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे समाज-समाजात तेढ आणि अशांतता निर्माण होत असेल तर अशी कृती कारवाईला पात्र ठरते. त्यानुसार कारवाई करू. सगळ्या देशात एकप्रकारे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातही अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
“सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा जास्त तडफड”; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
राज ठाकरे यांच्या सुरक्षाविषयी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांना कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय कमिटी घेईल. काही घटकांना केंद्राकडून सुरक्षा पुरविली जाते. मात्र त्यांच्याकडून राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण केले जाते. मात्र राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून जास्त सुरक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
“बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीय करतं”
दरम्यान, भाजप हा हिंदुत्वादी विचारधारा असणार पक्ष आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आडून भाजप जहाल हिंदुत्वाला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेली भुमिका आणि त्यानंतर राज्यात पडणारे पडसाद पाहता पीएफआय संघटनेने राज ठाकरेंना इशारा दिला आहे. छेडोगे तो छोडेंगे नहीं अस म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हे सर्व पाहता केंद्र सरकार राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Read also:
- सिल्व्हर ओकवरील हल्ला हा तर माझ्या आईवरच झालेला हल्ला- सुप्रिया सुळे
- तुरूंगात जाणार पण रूबाबात! न्यायालयीन कोठडीत नेतांना सदावर्तेंनी उडवली काॅलर
- मुंबई, सातारा, कोल्हापुर, बीड सदावर्तेंचा पुढचा मुक्काम ठरला! 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली
- ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, म्हणत पीएफआयचा इशारा! राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?
- आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? खोतांचा रोहित पवारांना प्रत्युत्तर