पुणे : महाराष्ट्राचे एक खूप मोठे साहित्यिक आहेत. त्यांनी 15 ते 20 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खरं हिंदुत्व कोणाच्या रक्तात आहे. हे मी कोणाला बोललो आहे हे त्यांनाही कळाल आहे. आणि जनतेलाही कळाल आहे. असे अनेक पक्ष असतील ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. आम्हला शाल पांघरायची गरज नाही हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. आमचा जन्मच हिंदुत्वातून झाला आहे.असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?
भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता ही सर्वांत जुनी आहे, हा शोध लागला आणि तो समाजापुढे आला. डीएनएची नवीन थेयरी समोर आली आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, हे सिद्ध झाले. आम्ही दुय्यम नाही, तर जगाला विचार देणारे आहोत. आत्मतेजाने, आत्मभानाने भारलेला समाज निर्माण होण्याची गरज. हिंदूत्त्व हे संकुचित नाही, तर ते व्यापक आहे. या संस्कृतीचा वाहक म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते आहे. आमच्या रक्तात हिंदूत्त्व. त्यामुळे आम्हाला कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारचे बारा वाजण्यास फक्त 12 दिवस बाकी..; मनसेच्या ‘त्या’ सभेची जोरदार चर्चा
आम्हाला भारताचे हित पहायचे आहे, अमेरिकेचे नाही, हे जेव्हा आमचे परराष्ट्र मंत्री सांगतात, तेव्हा तो नव्या भारताचा परिचय असतो. राष्ट्रवादाच्याच विचारांनीच भारत समोर जाईल आणि या प्रवासाचे उपकरण हे भारतीय जनता पार्टी असेल. हे पुस्तक म्हणजे केवळ भाजपाचा इतिहास नाही, तर एका शाश्वत विचाराला अंमलात आणणार्या संघटनेचा विचार आहे.
“आली रे आली.. पोलखोलीला घाबरून, मोहीम उधळून लावण्याची वेळ आली”
दरम्यान, भाजप : काल आज आणि उद्या या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे उपस्थित होते. हे पुस्तक शांतनू गुप्ता यांनी लिहलं असून याचा मराठी अनुवाद मल्हार पांडे यांनी केला आहे.यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांनी देखील आता हिंदुत्वाची शाल पांघरली आहे ती जुनी आहे की नवीन आहे यावर फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की हे तर काळच ठरवेल असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.
Read also:
- “मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो”; शरद पवारांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा टोला
- “जिथं तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही, तिथं सामान्य माणसाची काय कशा ?”
- “तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत सत्ताधारी-विरोधी गप्प”; त्यासाठी हुंकार यात्रा
- “ते भोंग्या बिग्यांचं बाजूला ठेवा, आधी महागाईचं बोला; राजू शेट्टींचा राज ठाकरेंना टोला
- “मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार”